राज्य सरकारचा शरद पवारांना आणखी एक दणका !

राज्य सरकारचा शरद पवारांना आणखी एक दणका !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्य सरकारनं आणखी एक दणका दिला आहे. बारामतीकडे वळवलेले दुष्काळी भागाचे नीरा देवधरचे पाणी पुन्हा दुष्काळी भागाला वळवण्यात आले आहे.
त्यामुळे याचा फायदा सांगोला, माळशिरस, पंढरपूर  फलटणला या भागाला होणार आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे दुष्काळी भागातील स्थानिकांकडून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.तसेच
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते यांचा प्रयत्नांना मोठं यश आलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत याबाबत आवाज उठवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेत बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी भागात वळवण्यात आले आहे.

दरम्यान नीरा देवधरचे 1954 साली वाटप करताना पुणे बारामती पाणी घेत असलेल्या डाव्या कालव्यात 43 टक्के तर सांगोला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूर पाणी घेत असलेल्या उजव्या कालव्याला 57 टक्के पाणी देण्याचा निर्णय झाला होता. पुढे 2009 मध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री झाल्यावर त्यांनी करार बदलत दुष्काळी उजव्या कालव्याचे जवळपास 11 टीएमसी पाणी बारामतीकडे डाव्या कालव्यात वळवले होते.डाव्या कालव्यात वळवलेले 11 टीएमसी पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी यासाठी ताकद पणाला लावली. त्यानंतर खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. परंतू तरीही आज सरकारनं
हे पाणी वळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पवारांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS