केंद्रात मंत्रीपदाबाबत सुजय विखेंचे सुचक विधान

केंद्रात मंत्रीपदाबाबत सुजय विखेंचे सुचक विधान

अहमदनगर : सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सध्या सुरू आहेत. अशातच गेल्या आठवड्यात खासदार डॉ. सुजय विखे आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियात शेअर केले. मात्र, आता शिर्डीतील एका कार्यक्रमात डॉ. सुजय विखे यांनी यासंबंधी एक सूचक वक्तव्य केले आहे. ‘साईबाबांच्या कृपेने केंद्रात मंत्री झालो, तरी मी आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहीन’, असे वक्तव्य त्यांनी केले.

सुजय विखे- पाटील म्हणाले, सध्या लोक मला दोनच प्रश्न विचारतात की तुम्ही केंद्रात मंत्री होणार का? आणि राज्याच्या सरकारमध्ये बदल होणार का? साईबाबांच्या कृपेने जर मी केंद्रात मंत्री झालो, तरीही आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहीन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप चांगले काम करतो आहे. संकट काळात भाजप आमच्या कुटुंबामागे उभा राहिला. खासदार झालो, तरी माझ्यात काही बदल झाला नाही, तसाच तो मंत्री झाल्यावरही होणार नाही.’

 

COMMENTS