मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प, वाचा अर्थसंकल्पातील मुद्दे!

मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प, वाचा अर्थसंकल्पातील मुद्दे!

नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन  यांनी  सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. 2020-21 या आर्थिक वर्षासाठीचा ताळेबंद मोदी सरकार नेमका कसा घालणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान यावेळी बोलत असताना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या धोरणावर आमचे सरकार पुढे जात आहे. भारत आज जगातील विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये आघाडीवर आहे. 2014 ते 2019 च्या दरम्यान मोदी सरकारच्या धोरणांमुळे 284 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आली ज्यामुळे व्यवसायात वाढ झाली असल्याचं म्हटलं आहे.

देशातील नागरिकांकडे रोजगार असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळेच हा अर्थसंकल्प त्यांचं उत्पन्न निश्चित करणारं आणि त्यांची क्रयशक्ती वाढवणारं असेल. तसेच 60 लाख नवे करदाते जोडले, 40 कोटी रिटर्न, 105 ई बिलं तयार झाली. पंतप्रधानांनी गरिबांना थेट फायदा होईल अशा योजना आणल्या असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS