पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का?, राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात…

पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का?, राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात…

अहमदनगर – भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत स्वत: विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझी बदनामी करण्याची कुणीतरी सुपारी घेतली असल्याची गंभीर टीका विखेंनी केली आहे.
‘मी काँग्रेस पक्षात स्वगृही परतणार या बातम्या निराधार आहेत. अशा अफवा पसरवून कोणीतरी मला बदनाम करण्याची सुपारी घेतली’ आहे. माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे मी सार्वजनिक जीवनात कुणाला भेटायचंही नाही का? राजकीय जीवनात आता कुणाशी संबधही ठेवायचे नाही का? असा संपप्त सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी 27 डिसेंबरला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे यांची एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेतली होती. त्यामुळे विखे आता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर प्रश्न विचारला असता व्यक्तीगत संबध ठेवू नये हि भुमिका दुर्दैवी आहे. विघ्न संतोषी लोक अशा प्रकारे संभ्रम पसरवताहेत. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणारांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचंही विखे पाटील म्हणाले आहेत.

COMMENTS