सत्तेसाठी काॅंग्रेस लाचार- विखे-पाटील

सत्तेसाठी काॅंग्रेस लाचार- विखे-पाटील

अहमदनगर – सरकामध्ये कोणताही समान कार्यक्रम नव्हता. सत्ता वाटपाचा कार्यक्रम होता. काॅंग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे, अशी टिका भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. सोनिया गांधींनी उध्दव ठाकरे यांनी लिहलेल्या पत्राच्या पाश्वभूमीवर राधाकृष्ण विखे- पाटील यांनी काॅग्रेसवर निशाना साधला.

काॅंग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय नेत्यांची दिशा भूल केली. केवळ सत्तेसाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे काॅंग्रेसने आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचेही विखे-पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, एक वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार अनुसूचित जाती व जमातीच्या समाजावर अन्याय करीत आहे. नोकर भरतीमध्ये जागा तसेच निधी उपलब्धता करू न देण्याचे काम करीत आहे. सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र सरकारने पत्र लिहिलेल्या पत्रानंतर काॅंग्रेसच्या नेत्यांनी सत्तेसाठी लाचार होऊ नये, आवाहन भाजपचे नेते गोपिचंद पडळकर यांनी केले.

 

COMMENTS