राज्यातील आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, मराठवाड्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही !

राज्यातील आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, मराठवाड्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही !

मुंबई – राज्यातील ८ तालुक्यात सरकारकडून मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ५, जळगाव जिल्ह्यातील २ आणि वाशिम जिल्ह्यातील १ तालूक्यांचा समावेश आहे. परंतु मराठवाड्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्यामुळे या विभागातील शेतक-यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील या तालुक्यात दुष्काळ जाहीर

राळेगांव

दिग्रस

घांटजी

केळापूर

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोधवड, तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांनी डिसेंबर महिन्यातच जळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर दुष्काळी तालुक्यात खडसे यांच्या मुक्ताईनगरचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान जून ते सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये कमी झालेला पाऊस, भूजल पातळीत झालेली घट, पाण्याची उपलब्धतता, पेरणीखालील क्षेत्र, पिकांची उपलब्धतता या सर्व गोष्टींचा विचार करून प्रभावीत झालेल्या तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांना खालील सवलती मिळणार

जमिन महसूलात सुट

सरकारी कर्जाचे पुर्नगठन

शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती

कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सुट

शालेय, महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी

-रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता

पाणी पुरवठ्यासाठी टॅंकर्सची सोय

शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे

मध्यान्ह भोजन योजना दीर्घ मुदतीच्या सुटीच्या काळातही सुरू ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान दुष्काळग्रस्त भाग म्हणून मराठवाड्याची ओळख असतानाही या विभागातील एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर न केल्यामुळे विरोधकांकडूनही जोरदार टीका केली जात आहे.

COMMENTS