संभाजीनगरचा मुद्दा शिवसेनेला फक्त निवडणुकीपुरता हवा – फडणवीस

संभाजीनगरचा मुद्दा शिवसेनेला फक्त निवडणुकीपुरता हवा – फडणवीस

नागपूर – काँग्रेसने औरंगाबादच्या संभाजीनगर या नामकरणाला विरोध केला काय किंवा नाही केला काय? शिवसेनेला हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता हवा असतो. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे असा टोला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने केली जात आहे. यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध करत हा समान कार्यक्रमाचा मुद्दा नाही, असे सांगितले.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर ही टीका केली आहे.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे म्हणून शिवसेनेला हा मुद्दा आठवतो आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळेच शिवसेनेने पुन्हा एकदा नामांतराचा विषय समोर आणला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी २०२१ हे वर्ष सगळ्यांना आनंदाचं आणि सुखासमाधानाचं जावो असंही म्हटलं आहे. तसंच यंदाच्या वर्षी तरी राज्य सरकार शेतकरी आणि मजुरांना मदत करेल अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS