‘काँग्रेस’मुक्त भारतासाठी आता जैविक अस्त्रांचा वापर !

‘काँग्रेस’मुक्त भारतासाठी आता जैविक अस्त्रांचा वापर !

‘काँग्रेस’मुक्त  भारतासाठी आता जैविक अस्त्रांचा वापर केला जात आहे,  हे वाजून तुम्हाला मोठा धक्का बसेल ना ! पण हे खरं आहे.    शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असलेले काँग्रेस (गाजर गवत) संपविण्यासाठी आणि त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने नामी युक्ती शोधली आहे. त्यांनी जैविक किड्यांची निर्मिती केली आहे. हे किडे संपूर्ण काँग्रेस म्हणजेच गाजर गवत खावून टाकतात. एक किडा एक रुपयाला मिळतो. हेक्टरी साडेचारशे किड्यांची गरज असते. म्हणजेच हेक्टरी केवळ साडेचारशे रुपयांचा खर्च येतो. विद्यापीठाचे काही विद्यार्थी आणि शेतकरी यांनी मिळून चार पाच दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा याचं प्रात्यक्षिक करण्यात आलं. अनेक ठिकाणी याचा प्रयोग केला जातोय. विद्यापीठाच्या या संशोधनाचे कौतुक केले जात असून शेतकरी वर्गातही सनाधान व्यक्त होत आहे.

( टीप – गाजर गवताला मराठवाड्यात विशेषतः उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस म्हणतात. त्यामुळे कोणीही गैरजमज करुन घेऊ नये. काँग्रेस पक्षाचा आणि या बातमीचा काहीही संबंध नाही. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला काँग्रेस पक्ष हा  मजबूत आणि बळकट असलाच पाहिजे, सदृढ लोकशाहीसाठी ते आवश्यक आहेच.  )

COMMENTS