“बंड केल्याने काँग्रेसमध्ये माणूस मोठा होतो” !

“बंड केल्याने काँग्रेसमध्ये माणूस मोठा होतो” !

मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष झाल्यानिमित्त आणि विधानसभेतील ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीला 55 वर्ष झाल्याबद्दल काल विधीमंडळात त्यांच्या अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले. यावेळी विविध पक्षातील नेत्यांनी देशमुख आणि पवार यांच्याबद्दलच्या आठवणी आणि किस्से सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही पवार आणि देशमुख यांच्या कार्य़ाचा गौरव आपल्या भाषणात केला. यावेळी बोलताना राणे यांनी एक किस्सा सांगितला. त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. जेंव्हा राणेंना डावलून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदी नेमले. तेंव्हा राणे प्रंचड संतापले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊ तो संताप व्यक्तही केला होता. पत्रकार परिषद संपल्यानंतर राणेंना शरद पवार यांचा फोन आला. तेंव्हा पवार राणेंना धीर देताना म्हणाले की तुम्ही जे काही केले आहे ते योग्य केले आहे. मी काँग्रेसमध्ये अनेकवेळा बंड केले आहे. काँग्रेसमध्ये बंड केल्यावर माणूस मोठा होतो.

तसं पाहिला गेलं तर राणेंनी शिवसेनेत बंड करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आजपर्य़ंत त्यांनी काँग्रेसमध्ये राहूनच पक्षांतर्गत बंड केलं आहे. त्यातून त्यांचा फारसा फायदा झालेला दिसून येत नाही. त्यामुळे आता राणे खरोखर पवारांप्रमाणे बंड  करुन पक्षाच्या बाहेर तर पडणार नाहीत ना ? त्याचे संकेत राणे देतात का ? असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.

COMMENTS