“पंतप्रधान मोदी, अमित शहा यांनी लोकांना ‘मुर्ख’ बनवले”

“पंतप्रधान मोदी, अमित शहा यांनी लोकांना ‘मुर्ख’ बनवले”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विकासाच्या गुजरात मॉडेल नावावर लोकांना ‘मुर्ख’ बनवले असून. तसेच हे मॉडेल पूर्णपणे अयशस्वी ठरल्याची टीका  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

पोरबंदर येथे पक्ष कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. ‘ ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्याला मुर्ख बनवलं आहे, ते अभूतपूर्व आहे.’ या वेळी त्यांनी गुजरातच्या विकास मॉडलेवरही प्रश्न उपस्थित केले. सामाजिक विकासाच्या सांकेतांकाच्या आधारे पाहिले तर गुजरात इतर राज्यांच्या तुलनेत मागास आहे.  व्हायब्रंट गुजरात समिट दरम्यान जे करार झाले. त्यावर अमंलबजावणीही झालेली नाही, असे दिग्विजय सिंह म्हणाले.

 

 

 

COMMENTS