भाजपच्या संवाद यात्रेला लातूरपासून प्रारंभ

भाजपच्या संवाद यात्रेला लातूरपासून प्रारंभ

विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेनंतर आता राज्यातील भाजप सरकार व पक्षाद्वारे येत्या 25 मे पासून राज्यात शिवार संवाद यात्रा सुरु होणार आहे. भाजपाची संवाद यात्रा 25 ते 28 असे चार दिवस असणार आहे.

25 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यात्रेची सुरुवात लातूरमधून करणार असून भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामध्ये शामील होणार आहे. या भाजप संवाद यात्रेत संपुर्ण राज्यातील ग्रामीण भागाला भेट देणार आहे. सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

COMMENTS