“मोदी, फडणवीसांचे जादुचे प्रयोग, कामात झिरो पण मतपेटीत हिरो”

“मोदी, फडणवीसांचे जादुचे प्रयोग, कामात झिरो पण मतपेटीत हिरो”

मुंबई – केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हे जनतेला नवनवे जादुचे प्रयोग दाखवत आहेत, जोपर्यंत जनतेचे यात मन रमेल तोपर्यंत भाजपला विजय मिळेल, मात्र जेंव्हा त्यांचे मन त्यातून उडेल तेंव्हा भाजपला पराभवाची चव चाखावीच लागेल अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधण्यात आला.

             ऐकेकाळी देशभरात काँग्रेसच जिंकत होती. कामात झिरो असली तरी मतपेटीत हिरो होती, भाजपची सध्या तशीच स्थिती आहे. मात्र एकना एक दिवस त्यांची काँग्रेससारखी स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर करण्यात आलीय. तीन महापालिकांच्या निकालावर शिवसनेतर्फे पहिल्यांदाच प्रतिक्रिया देण्यात आलीय.

सत्ता असली की गुळाला मुंगळे चिकटणारच! हे सत्ताधाऱ्यांच्याच बाबतीत घडत असते. मात्र जनता अशी वाहवत का चालली आहे,  मराठवाड्यातील शेतकरी व तरुण वर्ग गारुडय़ांच्या पुंगीमागे का चालला आहे याचा शोध घ्यावा लागेल. असंही संपादकीयमध्ये म्हटलंय.

COMMENTS