अजित पवारांचं पुणेकरांना भावनिक आवाहन !

अजित पवारांचं पुणेकरांना भावनिक आवाहन !

मुंबई – पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणेकरांसाठी काय केलं नाही. मोठ्या प्रमाणावर विकासकामं केली. सत्तेत असताना सर्व घटकांना निधी दिला. तरीदेखील आमची सत्ता गेली. त्यामुळे आगामी काळात तरी चांगलं कोण आणि वाईट कोण याची पारख करुन राष्ट्रवादी काँग्रेसलाच बहूमत द्या असं भावनिक आवाहन अजितदादांनी केलं आहे. आज काहीच चांगलं घडत नसून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. पुण्यात गुंडगीरी वाढली आहे. ज्यांचा कशाचाही संबंध नाही, त्यांच्या गाड्या पोचवण्यात येतात त्यामुळे याठिकाणचे पोलीस काय करतात असा सवालही अजितदादांनी केला आहे.

दरम्यान नीरव मोदीवर एक वर्षांपूर्वी धाड पडली होती. त्याची चौकशी झाली. तो बँकांचे पैसे बुडवतोय, हे सरकारला माहित होतं. डाओसमध्ये तो पंतप्रधानांसोबत फोटोत दिसतो त्यामुळे या गैरकारभारांना सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी अजित पवार यांनी केला आहे. पुण्यातील हल्लाबोत यात्रेदरम्यान अजित पवार बोलत होते.

COMMENTS