मुख्यमंत्र्यांना धमकीचं पत्र, सुरक्षेत वाढ !

मुख्यमंत्र्यांना धमकीचं पत्र, सुरक्षेत वाढ !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी धमकीचं पत्र पाठवलं आहे. मंत्रालयात एक निनावी पत्र आले असून त्यात मुख्यमंत्री आ णि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  या पत्रात आमचा मार्क्सवादाचा विचार तुम्ही संपवू शकणार नाही असं म्हटलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

दरम्यान मागच्या महिन्यात गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती. तसेच पुण्यातून नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक निनावी पत्र आलं असून यामध्ये त्यांना धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

 

 

 

COMMENTS