‘ही’ भाबडी आशा सोडा, एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर, फडणवीस यांनाही लगावला टोला!

‘ही’ भाबडी आशा सोडा, एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर, फडणवीस यांनाही लगावला टोला!

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये एक-दीड वर्षात उलथापालथ होईल, असं वाटत नाही. या सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे, त्यामुळे महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता एकनाथ खडसे यांनी टोला लगावला आहे. 10-15 वर्षांपूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’ हे जनतेला आवडलं की नाही. याचा आता मी शोध घेणार, असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पक्षात आलेल्या आयरामांचा फटका बसला आहे. मी पून्हा येईन, मी पुन्हा येईल… हे लोकांना आवडले नाही का? भाजपकडे सगळं असताना पराभव झालाच कसा? असा सवाल करत मला अनेक पक्षांची ऑफर असल्याची गौप्यस्फोट खडसेंनी यावेळी केला.राज्यात भाजप-शिवसेना युती नसताना 123 भाजप आमदार निवडून आणले. मात्र, युती झाल्यावर 107 कसे झाले? असा सवालही यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS