राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी जयंत पाटलांचं पत्र !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी जयंत पाटलांचं पत्र !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. याबाबतची पोस्ट त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. तसेच प्रदेशाध्यक्षपदावर आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आपले अभिनंद केले याबद्दलही मी सर्वांचा आभारी असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मी गेली अठ्ठावीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा सदस्य आहे. या अठ्ठावीस वर्षात राज्यकर्त्यांना आणि त्यांच्या धोरणात्मक निर्णयांना जवळून अनुभवण्याची संधी मला लाभली. मी आपल्याला खात्रीशीररित्या सांगू ईच्छितो की सध्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्राचे कृषी, आर्थिक, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील अत्यंत दुरगामी नुकसान झालेले असून ते योग्यवेळी दुरुस्त न झाल्यास त्याची फळे येणा-या पिढ्यांना भोगावी लागतील, आज रज्यातील शेतकरी, मध्यमवर्ग आणि उद्योजक प्रचंड अस्वस्थ असून या तीनही वर्गांचे या सरकारने फार मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे येणा-या निवडणुकांमध्ये सरकारला याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा या पत्राद्वारे जयंत पाटील यांनी दिला आहे.

सविस्तर पत्र वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…..

COMMENTS