उद्यापासून खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुसरी शेतकरी यात्रा !

उद्यापासून खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुसरी शेतकरी यात्रा !

धुळे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात उद्यापासून दुसरी शेतकरी यात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी राजू शेट्टी हे धुळे जिल्ह्याच्या दौ-यावर गेले असून याच ठिकाणाहून ते या यात्रेला सुरुवात करणार आहेत. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही यात्रा काढण्यात येणार आहे.  दोन हजार किलोमीटरचा प्रवास करुन उस्मानाबाद येथे तिचा समारोप होईल. या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना ‘आता मरायचं नाही, लढायच..’ असा संदेश देण्यात येणार आहे.

दरम्यान मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या धुळे जिल्ह्यातील विखरण या गावापासून ही यात्रा काढण्यात येणार असून संकटात सापडलेल्या आणि खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच या यात्रेत राज्यातील अनेक शेतकरीही सहभाग घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या यात्रेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS