मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते ‘सामना’च्या आगीने जळून खाक होईल –शिवसेना

मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते ‘सामना’च्या आगीने जळून खाक होईल –शिवसेना

मुंबई ‘सामना’च्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते ‘सामना’च्या आगीने जळून खाक होईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांनी सामनातून मुख्यमंत्र्यांना दिला आहे. ‘सामना थोडीच सरकार चालवतं, सरकार तर मी चालवतो,’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं.

दरम्यान मुख्यमंत्र्यांना सकाळी उठून ‘सामना’ वाचावाच लागतो. सत्याचे कडू घोट पचवायला हिंमत लागते. ‘सामना’ हा जनतेचा लाऊडस्पीकर आणि खोटारड्यांचा आरसा आहे. मुख्यमंत्र्यांनी चौथ्या वर्षी मैत्रीचा, युतीचा सूर लावला आहे. फडणवीस म्हणतात, काही झाले तरी युती होईल. जागा वाटपावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. श्रीमान फडणवीस यांनी असेही सांगितले की, हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती अतिशय आवश्यक आहे. शाब्बास! शाब्बास देवेंद्रजी! अब आया उंट पहाड के निचे, असे आम्ही मानावे काय? असा सवालही आग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

 

COMMENTS