विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाड !

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाड !

बीड – विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाड झाला असल्याचं दिसून येत आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्याने आघाडी तुटली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचे ठरविले आहे.

दरम्यान दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता. त्यामुळे या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज किशोर मोदी अर्ज भरणार असून मोदी हे अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष आहेत. तर या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रमेश कराड यांचा अर्ज भरण्यात आला आहे. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यामुळे ही निवडणूक आता चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS