अखेर एअर इंडियाने शिवसेना खा. रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदी हटवली!

अखेर एअर इंडियाने शिवसेना खा. रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदी हटवली!

नवी दिल्ली-  शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासबंदी अखेर एअर इंडियाने मागे घेतली आहे. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर एअर इंडियाने आपला निर्णय मागे घेतला आहे.

खा. रवींद्र गायकवाड यांनी माफी माघावी अशी भूमिका एअर इंडियाने घेतली होती. पण मी संसदेची माफी मागेन, एअर इंडियाची नाही असे रवींद्र गायकवाड यांनी म्हटले होते. जवळपास दोन आठवड्यांनी ही बंदी हटवण्यात आली आहे.

खा. गायकवाड यांचा पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याशी वाद झाला होता. 23 मार्चला घडलेल्या या घटनेत  गायकवाड यांनी आपण सँडलने मारल्याचं कबुल केले होते. मात्र, काल लोकसभेत निवेदन देताना, गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने धक्का दिल्याने आपणही धक्का दिल्याचे म्हटले होते.  याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही लक्ष घातले होते. अखेर 15 दिवसांनी एअर इंडियाने गायकवाडांवरील विमानप्रवास बंदी हटवली आहे.

 

COMMENTS