खडसेंनी भाषण न केल्याने फडणवीसांचा जीव भांड्यात !

खडसेंनी भाषण न केल्याने फडणवीसांचा जीव भांड्यात !

कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही विरोधक एकनाथ खडसेंच्या घरी गेलो असं काल (दि. 21) जयंत पाटील विधानसभेत म्हणाले आणि सभागृहात एकच हश्श्या पिकला. यावेळी जयंत पाटलांनी खडसेंना बाहुबली सिनेमातला अमरेंद्रसिंह बाहुबली असा उल्लेख केला. आणि  आक्रमक असलेले सत्ताधारी बॅकफूटवर गेले. बाहुबली बोलले तर भूकंप होईल असं ही जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे जयंत पाटलांनंतर भाषणाचा नंबर असलेले एकनाथ खडसे काय बोलतात याकडे सगळ्या सभागृहाचं लक्ष लागलं होतं. मात्र एकनाथ खडसे काहीही बोलू नये यासाठी मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. काही सूचना असतील तर त्या सांगा त्याची दखल घेतो पण भाषण करू नका अशी विनंती करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. आणि शेवटी एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा मान राखत भाषण केलं नाही. खडसेंनी भाषण न केल्यानं अखेर सत्ताधाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

 

COMMENTS