आभाळ फाटलय, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही – मुख्यमंत्री

आभाळ फाटलय, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही – मुख्यमंत्री

आधीच राज्यात वित्तिय तूट आहे, ती भरून काढावी लागणार आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, यामुळे राज्याच्या तिजोरीवर निश्चित भार येणार आहे. पण एकदा निर्णय घेतला की त्यातून मार्ग काढू. सध्या आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे, पण ती आम्ही शिवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पुणतांब्याच्या संपात सहभागी झालेल्या 40 गावच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याच्या तिजोरीवर कर्जमाफीचा निश्चित भार येणार आहे. आम्हाला सुरु असलेल्या विकास प्रकल्पांसाठीच कर्ज काढावे लागणार होते, मात्र आता इनोव्हेटिव्ह पद्धतीने पैसे उभे करू, आता कर्जमाफी करण्याआधी अर्थसंकल्पात 4000 कोटींची तूट आहे. पण तरीही आम्ही पैसा उभा करू. कर्जमाफीमुळे शेती क्षेत्रातील गूंतवणूक, विकास कामांच्या पैशाला कात्री लावणार अश्या बातम्या आल्या पण आम्ही शेती क्षेत्रातील गूंतवणूक कमी करणार नाही. आम्ही पैसा उभा करू…हमीभाव परवडत नाही कारण गुंतवणूक नाही. गुंतवणूकसाठी पैसे कमी पडता कामा नये. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱयांना कर्जमाफी करणे हे राज्य सरकारच्या आधीच मनात होते. त्यामुळेच कर्जमाफी केली गेली. जर आमच्या मनात कर्जमाफी करण्याचे नसते तर आमच्याकडे अनेक कारणं होती. पण आम्हाला कर्जमाफी करायची होती, त्यामुळे आम्ही कर्जमाफी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

COMMENTS