आ. बच्चू कडूंची आसूड यात्रा पोलिसांनी गुजरात सीमेवर रोखली

आ. बच्चू कडूंची आसूड यात्रा पोलिसांनी गुजरात सीमेवर रोखली

नंदुरबार – शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी आज आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रा काढली आहे. ही यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या गावापर्यंत जाणार होती. मात्र गुजरातच्या सीमेवर ही यात्रा पोलिसांनी रोखली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनेर या गावात या आसूड यात्रेचा उद्या समारोप होणार होता. मात्र, नवापूर चेकपोस्टवर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखले. चेकपोस्टवर गुजरात पोलिसांचा मोठ्ठा फोजफाटा तैनात करण्यात आला आहे. आसूड यात्रा रोखल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी आसूड यात्रा काढण्यात आली आहे.

COMMENTS