“उद्या माझा मृत्यू झाला तर पक्षाचं कसं होणार?”

“उद्या माझा मृत्यू झाला तर पक्षाचं कसं होणार?”

‘जर उद्या माझा मृत्यू झाला तर पक्षाचं काय होणार’, असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कर सर्वांनाच धक्का दिला. नितीश कुमारांना या वक्तव्याबद्दल विचारणा होऊ लागल्यावर त्यांनी ‘ऐसेही मुह से निकल गया, कूछ खास बात नहीं है‘ असे उत्तर दिले.
या वक्तव्याबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते संजय झा यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले ते म्हणाले ‘ मी बरेच वर्ष त्यांच्याबरोबर काम करतोय पण, असे वक्तव्य त्यांनी कधी केलेले मी ऐकलेले नाही.’ याचबाबत पार्टीचे राज्य प्रमूख बी.एन. सिंग म्हणाले ‘ कोणालाही अजून दहा वर्षेतरी नितीश कुमारांच्या वारसदाराची चिंता करण्याची गरज नाही.‘
जदयूने भाजप बरोबर आघाडी करुन बिहारमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर पक्षात दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. त्यामुळेच त्यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

COMMENTS