कर्जमाफीवरुन विधानसभेत रणकंदन, विरोधकांचा सभात्याग !

कर्जमाफीवरुन विधानसभेत रणकंदन, विरोधकांचा सभात्याग !

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरवातीलाच कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत.  राज्यातील शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत सभात्याग केला.

कर्जमाफीसाठी अनेक लादण्यात आलेल्या अटींवरुन काँग्रेस – राष्ट्रवादीने सभात्याग करुन आपला निषेध नोंदविला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुरवणी मागण्यात 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. तसेच कर्जमाफीबाबत विरोधकांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल. सरकार चर्चेला तयार आहे असं स्पष्ट करण्यात आले.

 

COMMENTS