गोरखपूरसारख्या घटना टाळण्यासाठी भाजपला सत्तेवरुन खाली खेचा – अशोक चव्हाण

गोरखपूरसारख्या घटना टाळण्यासाठी भाजपला सत्तेवरुन खाली खेचा – अशोक चव्हाण

मीरा भाईंदर – गोरखपूरमधील झालेल्या दुर्दैवी घटनेसारख्या घटना महाराष्ट्रात घडू नये असे वाटत असेल तर मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाला योग्य तो धडा शिकवा अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय. मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री अशोक चव्हाण यांची सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप आणि  शिवसेनेवर जोरदार टीका केली. मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसच्या हातात सत्ता द्या, तुमच्या विकासाची मी जबाबदारी घेतो असं आश्वासनही त्यांनी दिलं.

खाऊंगा न खाने दुंगा असं म्हणारे चिक्कीपासून जमिनीपर्य़ंत सगळेच खात आहेत असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला. राज्याच्या मंत्रिमंडळातले प्रकाश मेहता आणि मीरा भाईंदरचे नरेंद्र मेहता हे सारखचे असल्याची टीकाही त्यांनी केली. व्यापारी म्हणत आहेत एक ही भूल कमल का फूल तर शिवसेनेचाही भाजपवर भरोसा नाय तर जनतेचा दोन्ही पक्षावर भरोसा नाय असंही चव्हाण म्हणाले. भाजपच्या राज्यात हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणे लावली जात आहेत, गोरक्षकांकडून गरिब दलित अल्पसंख्यांकांच्या कत्तली सुरु आहेत असा आरोपही त्यांनी केला.

गोरखपूर दुर्घटनेचा संदर्भ देत काँग्रेसने कधी टेंडर आणि बिलं थांबवून बालकांचे बळी घेतले नाहीत.  त्यामुळे गोरखपूरमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात होऊ द्यायचं नसेल तर भाजपला सत्तेवरून दूर करा असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं.

COMMENTS