जयंत पाटीलांना सत्तेत येण्याची घाई, मुनगंटीवारांचा टोला

जयंत पाटीलांना सत्तेत येण्याची घाई, मुनगंटीवारांचा टोला

जीएसटीसाठी बोलावण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचा आज (सोमवार) शेवटचा दिवस होता. यावेळी कामकाजाला विधानभवनात सुरवात होताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जयंत पाटीलांचा खरपुस समाचार घेतला. जयंत पाटीलांनी कटप्पा आणि बाहुबलीचा संदर्भ देऊन काल भाजपवर टीकास्त्र सोडले होते. त्यावरूनच अर्थमंत्र्यांनी त्यांच्यवर हल्लाबोल केला.

यावेळी मुनगंटीवार म्हणालेत, जयंत पाटीलांना सत्तेत येण्याची घाई झाली आहे. भाजपमध्ये बोर्डीकरांना घेतलं म्ह्णून आता जयंत पाटीलांच्या पोटात दुखत आहे. पाटील संपर्कात असूनही त्यांना भाजपात घेतलं नाही याच त्यांना दुःख आहे.

मुनगंटीवारांच्या या व्यक्तव्यानंतर मात्र राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील चांगलेच संतापलेत. जयंत पाटील तर दूरच राहिलेत  मुनगंटीवार आणि वळसे पाटीलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दिलीप वळसे पाटील हे मुनगंटीवार म्हणालेत, तुम्हाला आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं, आणि कधी घ्यायचं ते घ्या. मात्र प्रत्येक भाषणात त्याचा उल्लेख करून इतर नेत्यांविषयी शंका निर्माण करु नका.

COMMENTS