जातीला गाठोड्यात बांधून जमिनीत गाडायला हवे – मीरा कुमार

जातीला गाठोड्यात बांधून जमिनीत गाडायला हवे – मीरा कुमार

काँग्रेस नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार  उद्या (ता. 28) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  मीरा कुमार या काँग्रेसचे दिवंगत नेते बाबू जगजीवन राम यांत्या कन्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जगजीवन राम हे केंद्रात महत्त्वाचे दलित नेते होते. मीरा कुमार राष्ट्रपतीपदासाठी प्रचाराला साबरमती आश्रमापासून सुरुवात करणार आहे. तसंच येत्या 1 तारखेला त्या पटनाहुन दिल्लीला जाणार आहे आणि तिथे यूपीएच्या घटकपक्षांशी चर्चा करणार आहे.

मीरा कुमार यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेतली. गुजरातमधील साबरमती आश्रमातून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला आपण सुरुवात करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  कोविंद निवडणूक लढवत आहे. मीही आहे. मग दलित निवडणुकीला उभे आहेत, असे बोलले जात आहे. आमच्यातील बाकीचे गुण गौण ठरतात. यावरून समाज आजही काय विचार करतो हे दिसून येते. आता तर जातीला गाठोड्यात बांधून पुरायला हवे, समाजाला पुढे नेण्यासाठी त्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

निःपक्षतेबाबत प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ प्रसिद्ध करणाऱ्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही त्यांनी उत्तर दिले. याआधीच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांमध्ये अनेकदा उच्च जातीचे उमेदवार उभे होते. पण त्यावेळी कुणीही त्यांच्या जातीची चर्चा केली नाही.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठींबा दिल्याबद्दल विचारले असता, राजकारणात ही काही नवीन बाब नाही. निवडणुकीत समर्थन मिळवण्यासाठी सर्व सदस्यांना पत्र पाठवले आहे. त्यात नितीशकुमारही आहेत, असेही मीरा यांनी सांगितले.

 

COMMENTS