… तर 2019 मध्ये मोदी सरकारचा सहज पराभव करु – लालूप्रसाद यादव

… तर 2019 मध्ये मोदी सरकारचा सहज पराभव करु – लालूप्रसाद यादव

पाटणा – उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या तब्बल 84 जागा आहेत. त्यातल्या 78 जागांवर भाजपने 2014 मध्ये कब्जा केला होता. 2019 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला हरवायचे असेल तर अखिलेश यादव आणि मायावती यांनी एकत्र यायला पाहिजे. ते दोघे एकत्र आले तर उत्तर प्रदेशातून भाजप हद्दापार होईलच त्याचबरोबर देशात भाजप सरकराचा पराभव होईल असं वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अखिलेश यादव आणि मायावती यांना एकत्र येण्याचं आवाहनही लालूप्रसाद यादव यांनी केलं आहे. बिहारमध्ये राजद, येडीयू आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे भाजपचा सफाया झाला. तोच प्रकार उत्तर प्रदेशात होऊ शकतो असा दावाही त्यांनी केला.

COMMENTS