धनगर आरक्षणाचा प्रस्ताव अजून केंद्राकडे पाठवलाच नाही

धनगर आरक्षणाचा प्रस्ताव अजून केंद्राकडे पाठवलाच नाही

नवी दिल्ली – धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याचा ठराव राज्य सरकारने अजून केंद्राकडे पाठवलाच नाही. धनगर समाज हा धनगड असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवणे अपेक्षीत होते. मात्र तोच प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला नाही. अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारकडे आला नाही अशी माहिती केंद्रीय सामाजित न्यायमंत्री गहलोत यांनी आज लोकसभेत दिली. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नाचं भिजत घोंगड पडललेलं आहे.

COMMENTS