नथुराम गोडसे स्मारक प्रकरणावरुन विधान परिषदेत गोंधळ!

नथुराम गोडसे स्मारक प्रकरणावरुन विधान परिषदेत गोंधळ!

कल्याणपासून पाच-सहा किमी अंतरावर असलेल्या सापाड गावात हिंदु महासभा नथूराम गोडसे यांचे स्मारक उभारणार आहे. यासाठी दोन गुंठे जागा ताब्यात घेण्यात आली आहे. यावर काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी विऱोध केला आहे. नथूराम गोडसे यांचे स्मारक उभारणे हा  पुुरोगामी महाराष्ट्राला कलंक लागेल असा आरोप संजय दत्त यांनी केला.

‘अशी परवानगी दिली जाणे शक्यच नाही. कोणत्याही पुतळ्याला परवानगी देण्यासाठी भली मोठ्या परवानग्या घ्याव्या लागतात. या प्रकरणाची चौकशी करू’. असे महसूल मंत्री चंद्रकात पाटील म्हटले आहेत.

खासगी जागेत पुतळा उभारणार आहेत. त्यात सशस्त्र प्रशिक्षण दिलं जाणार. ही काय पद्धत, परवानगी दिली नाही तर हे थांबवणं सरकारचे काम आहे. असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेमंत टकले यांनी म्हटलं  आहे.

 

COMMENTS