“नारायण राणेेंच्या दुखण्यावर त्यांच्याशी चर्चा करु”

“नारायण राणेेंच्या दुखण्यावर त्यांच्याशी चर्चा करु”

पंढरपूर – नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा  सध्या सुरु आहे. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी नारायण राणे यांना समाजावून घेत त्यांचे नेमके दुखणे काय आहे?, ते कॉंग्रेस सोडून जाण्याचा विचार का करीत आहेत. या त्यांच्या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन त्यांच्याशीच आपण चर्चा करणार असल्याच म्हटल आहे.

पतंगराव कदम यांनी सोमवारी श्रीविठ्ठल दर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘कॉंग्रेस पक्षाने राणे पिता-पुत्रांना भरपूर दिले आहे. कॉंग्रेसने राणे यांनी विधानसभा व लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. पक्षात मानसन्मान दिला. तरीही त्यांचे काय दुखणे आहे हे त्यांना विचारू आणि भाजप प्रवेशापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करू.” कोकण असो की मुंबई, राणे यांचा शिवसेनेने पराभव केला आहे; कॉंग्रेसने नाही, असे ते यावेळी म्हणाले.

 

COMMENTS