“नारायण राणे भाजपात गेल्यास सिंधुदूर्गच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही”

“नारायण राणे भाजपात गेल्यास सिंधुदूर्गच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही”

कोल्हापुर –  “नारायण राणे भाजप मध्ये गेले तरी सिंधुदूर्गच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. असे मत गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले.

निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पाळली गेली पाहिजेत भाजप काही तत्वावर काम करणारा पक्ष आहे राणेंचे चरित्र काय आहे. भाजप राजकारणासाठी तत्वाला मुरड घालणार आहे काय ? असा सवाल दिपक केसरकर यांनी केला. मुरगूड येथील नगरपालिकेच्या विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी दिपक केसरकर आले होते.

यावेळी केसरकर  म्हणाले, ‘राणेंच्या गैर कारभाराच्या बातम्या वृत्त पात्रातून छापून आल्या.त्याच्यावर काय कारवाई झाली ? हा सवाल राज्यातील जनतेने केला पाहिजे. अनिष्ट प्रवृत्तीना विरोध करणं हे माझे सुरवातीपासूनचे तत्व आहे. त्यामुळे नारायण राणे भाजपमध्ये गेले तरी त्याचा कोणताही परिणाम कोकणच्या राजकारणावर होणार नाही,’ असेही केसरकर म्हणाले.

 

COMMENTS