“नोटबंदी हा देशातील आजपर्य़ंतचा सर्वात मोठा घोटाळा”

“नोटबंदी हा देशातील आजपर्य़ंतचा सर्वात मोठा घोटाळा”

 

नोटबंदी हा आजपर्यंतचा देशातला सर्वात मोठा घोटाळा होता अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. नोटबंदीमुळे रद्द झालेला जवळपास 99 टक्के पैसे जमा झाले असं आरबीआयनं म्हटलं होतं. त्यावरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकावर हल्लाबोल केला. आरबीआयच्या म्हणण्याप्रमाणे 99 टक्के पैसा जमा झाला असेल तर सर्व काळा पैसा हा पांढरा झाला आहे. ट्विट करुन चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 पासून ते 30 जून 2017 या कालावधीत चलनातून रद्दबादल झालेले जवळपास 99 टक्के चलन परत बँकेमध्ये आले आहे. यावरुन आता मग नोटबंदीचा उपयोग काय झाला असाही सवाल विचारला जात आहे. यावरुन सरकारवर चौफेर टीका होत आहे.

COMMENTS