परभणी, मालेगाव, भिवंडीनंतर आता मालेगावमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार – अशोक चव्हाण

परभणी, मालेगाव, भिवंडीनंतर आता मालेगावमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार – अशोक चव्हाण

मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर  अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निवडणूकीत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) चा काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

यावेळी  अशोक चव्हाण म्हणाले की,  ‘काँग्रेस पक्ष मिरा भाईंदर शहराच्या विकासासाठी कटिबध्द आहे.  काँग्रेस पक्षाने मिरा भाईंदर शहराचा विकास केला म्हणून जनतेने 25 वर्ष काँग्रेसला सत्ता दिली . काँग्रेसने परभणी, मालेगाव भिवंडी महापालिका जिंकल्या मिरा भाईंदर महापालिका ही काँग्रेस जिंकणार.’

‘भाजप खरेदी विक्री संघ झालाय दुस-या पक्षातील लोकांना धमकावून लालच दाखवून पैसे देऊन भाजपात घेतले जात आहे. शिवसैनिक पक्ष प्रमुखाला म्हणतात तुमचा आमच्यावर भरोसा नाय का ? भाजप शिवसेनेवाले एवढी उद्घाटने करून आणि नारळ फोडून गेले की मिरा भाईंदर मध्ये नारळच्या किंमतीच्या वाढल्या.  गेल्या तीन वर्षात स्मार्ट सिटीच्या घोषणा एकही काम केले नाही. जी कामे सुरु आहेत युपीए सरकारने JNNURM योजनेतून सुरु केलेली आहेत. भाजपने काँग्रेस सरकारने सुरु केलेल्या योजनांची नावे बदलली आहेत. भाजप सरकार फक्त नेम चेंजर आहे. भाजप शिवसेनेच्या भांडणात राज्याचे वाटोळे करून ठेवले आहे. भाजप सरकारविरोधात बोलले की देशद्रोही ठरवले जात आहे .कोणी काय खायच कोणी काय बोलायच हे सरकार ठरवू लागले आहे ही भूमिका लोकशाहीसाठी घातक आहे. हा देश सर्व धर्माच्या लोकांचा आहे. देशाची धर्मनिरपेक्षता टिकविण्यासाठी भाजपला सत्तेतून खाली खेचावे लागणार आहे.’

 

COMMENTS