भगवानगडाचा राजकीय वापर कधीही केला नाही – पंकजा मुंडे

भगवानगडाचा राजकीय वापर कधीही केला नाही – पंकजा मुंडे

भगवानगड हा विषया आमच्या भावनेचा विषय आहे, जीव की प्राण आहे, अनेक वर्षे मी जात आहे. माझी अपार श्रद्धा भगवानबाबा यांच्या गादीवर आहे. भगवान गडचा राजकीय वापर कधीही केला नाही, होणार नाही. असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

मी अशा परिस्थितीमध्ये आहे की एका बाजूला लाखो लोक आहेत एका बाजुला महंत नामदेवशास्त्री आहेत ते एक गोष्ट सांगत आहेत. मी गादीविरोधात कधीही बोलणार नाही. मी द्विधा मनस्थितीमध्ये आहे. माझे महंत यांच्याशी मतभेद नाहीत. असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहे.

COMMENTS