भाजपचाच खासदार म्हणतो, भाजप सरकार अदानी, अंबानींची घरे भरत आहे !

भाजपचाच खासदार म्हणतो, भाजप सरकार अदानी, अंबानींची घरे भरत आहे !

अकोला – भाजपचे भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी स्वपक्षावरील हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. काल अकोल्यामध्ये तर त्यांनी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे सरकार हे अदानी आणि अंबानी या उद्योगपतींची घरे भरत असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा नाही, त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. मात्र त्यांच्या लाडक्या उद्योगपतींची मात्र घरे भरली जात आहेत असंही नाना पटोले म्हणाले. अकोल्यामध्ये एका शेतकरी कार्यक्रमात ते बोलत होते. सप्टेंबर अखेर कर्जमाफी शेतक-यांच्या पदरात पडली नाही तर सरकारविरोधात अधिक आक्रमकपणे आंदोलन करु असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

COMMENTS