भाजपची 25 मे पासून ‘शिवार संवाद यात्रा’

भाजपची 25 मे पासून ‘शिवार संवाद यात्रा’

भाजपकडून येत्या 25 मे पासून ‘शिवार संवाद यात्रा’ सुरू केली जाणार आहे असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खा. दिलीप गांधी यांच्या निधीतून झालेल्या विकास कामांच्या उद्‍घाटनानिमित्त अहमदनगर येथे आले असता याविषयी माहिती दिली.

 

यावेळी दानवे म्हणालेत,’ आपण स्वतः या यात्रेनिमित्त 15 दिवस राज्यांत फिरणार आहोत. पक्षाचे सर्व मंत्री, आमदार व खासदारही यात सहभागी होणार आहेत. राज्यातील 90 हजार बूथवर यानिमित्ताने जाणार आहोत,’ असे सांगितले, ‘भाजप कर्जमाफीच्या विरोधात नाही. पण आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे आहे. त्यामुळे अन्य पक्षांच्या कितीही दिंड्या यात्रा निघाल्या तरी आता भाजपच शिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने शेतीतील शाश्वत गुंतवणूक, शेतीसाठी पाणी व वीज उपलब्धता, शेतीमाल बाजारपेठ विकास योजनेसह शासनाच्या विविध योजनांची माहिती देणार असल्याचेही ते म्हणालेत.

COMMENTS