भाजपच्या प्रवक्त्याचे ताळतंत्र सुटले, म्हणे संपात नक्षलवादी, माओवादी, देशद्रोही घुसले !

भाजपच्या प्रवक्त्याचे ताळतंत्र सुटले, म्हणे संपात नक्षलवादी, माओवादी, देशद्रोही घुसले !

भाजपच्या नेत्यांची आणि प्रवक्त्यांची डोकी ठिकाणावर आहेत का ?  अशी शंका यावी अशी वक्तव्य त्यांच्याकडून होत आहेत. आता भाजपचे प्रवक्ते अवदूत वाघ यांची फेसबूक पोस्ट वाचा —- ते म्हणतात …

शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला संप अस म्हटलं तेव्हाच कळलं की यात माओवादी नक्शलवादी लाल माकडांची देशद्रोही औलाद घुसली आहे.

माझ्या बळीराजा, सावध रहा

जर या आंदोलनात माओवादी आहेत, नक्षलवादी आहेत तर वाघसाहेब त्यांना तुम्ही बेड्या का ठोकत नाहीत. गृहखातं तुमच्या लाडक्या मुख्यमंत्र्याकंडं आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत. मग त्यांच्यावर कारवाई करायला तुम्हाला कोणी अडवलंय ? तुमच्या या फेसबूक पोस्टवरुन असं दिसंतय एकतर शेतक-यांनी पुकारलेल्या कडकडीत बंदमुळे तुम्ही धास्तावला आहात आणि त्यामुळे ताळतंत्र सोडून काहीही वायफळ बडबड करत आहात. किंवा तुम्हाला सत्तेचा माज आलेला आहे ?  किंवा तुमच्या डोक्यावर परिणाम तरी झालेला दिसोतय. कारण तुम्ही आणि तुमचे मुख्यमंत्री बळीराजालाच माओवादी, नक्षलवादी, देशद्रोही ठरवायला लागला आहात. सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. ती आज आहे उद्या नाही. शेतक-याचा संयम सुटला ना तर तुमची पळता भुई थोडी होईल हे लक्षात ठेवा.

 

COMMENTS