भाजप सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील- अशोक चव्हाण

भाजप सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील- अशोक चव्हाण

‘लष्कराच्या ताब्यात जागा असली तरी पेलेट गनचा वापर करणे अयोग्य आहे. भाजप सरकारची मानसिकता यातून दिसून येते, भाजप सरकारचा शेतकऱ्यांबद्दल असलेल्या असंवेदनशीलतेचा हा परिणाम आहे’.  अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

नेवाळी विमानतळाच्या जमीन अधिग्रहणावरुन आज शेतक-यांनी आंदोलान केले,  या आंदोलानाला हिंसक वळण लागलं होत. शेतक-यांनी कल्याण मलंगगड रस्ता रोखल्यानंतर पोलिसांनी तिथल्या शेतक-यांवर लाठीमार केला. संतप्त झालेल्या शेतक-यांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमीनी संपादित केल्याचा आरोप करत परिसरातील शेतक-यांनी त्याविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे.

नेवाळी येथील स्थानिकांच्या हिंसक आंदोलनानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळाची भेट घेतली. सर्व सहमतीने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाषजी भामरे 29 जूनला संबंधितांची बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS