मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी आमदारांना काय मार्गदर्शन केले ?

मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी आमदारांना काय मार्गदर्शन केले ?

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची आज बैठकी घेतली होती. यात पावसाळी अधिवेशनाच्या रणनीती बाबत चर्चा झाली. अधिवेशनात मांडायचे राज्यातील प्रश्न, मुंबईचे प्रश्न याबाबत चर्चा झाली. कर्जमाफी, मुंबईची सुरक्षा असे विषय आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं.

दरम्यान, मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी नीलम गोर्‍हे म्हणाल्या, स्वाती साठे यांनी ते मेसेज आपण केले नाहीत असं अजून म्हटलेल नाही. त्यांनी असे मेसेज करणं खेदजनक आहे. न्यायाची अपेक्षा असणाऱ्यानी आरोपीची बाजू घेणं चुकीचे. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्रीनी याबाबत बोलावं. न्यायालयीन चौकशीची आमची मागणी आहेच.  ज्यांना आम्ही नायक समजतो त्यांनी खलनायक बनू नये.

COMMENTS