मीरा भाईंदर निकालावर मुख्यमंत्र्यांनी काय दिली प्रतिक्रीया ?

मीरा भाईंदर निकालावर मुख्यमंत्र्यांनी काय दिली प्रतिक्रीया ?

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता राखली आहे.  95 जागांपैकी भाजपने  61 जागा जिंकल्या आहे.  तर शिवसेनेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली असून तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. राष्ट्रवादी आणि मनसेला भोपळाही फोडता आला नाही.

‘मीराभाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि टीम भाजपच्या प्रयत्नांमुळे तयार केलेल्या ‘विश्वास आणि विकास’ या लाटेमुळे झाला. सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद लुटला… आमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मीराभाईदरचे मी आभारी आहे.’ अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

COMMENTS