मुंबईकरांना शेतकरी संपाचा मोठा फटका, भाजीपाल्याची आवक 60 टक्के घटली

मुंबईकरांना शेतकरी संपाचा मोठा फटका, भाजीपाल्याची आवक 60 टक्के घटली

जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी कालपासून संपावर गेल्याने सामान्य त्याची झळ पोचायला सुरुवात झाली आहे. शेतक-यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवशी भाजीपाल्याचे भाव दुपट्टीने वधारले आहेत. शेतक-यांच्या संपामुळे मुंबईत भाजीपाल्याची 60 टक्के आवक घटली आहे. संपाचा भाजीपाला पुरवठ्यावर मोठा  परिमाण झाला असून  पुरवठा कमी झाल्याने भाजीपाल्याची दरवाढीचे चटके आता बसू लागले आहेत.

 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातून एकही ट्रक मालाची आवक झाली नाही.  परराज्यातील अवघे साडेतीनशे ट्रक भाजीपाला आणि फळांची आवक झाली आहे. राज्यभरातून साठ टक्के भाजीपाला, फळे मुंबईत येतात, यात नाशिक, पुणे जिल्ह्यांचा वाटा मोठा प्रमाणावर असून उर्वरीत चाळीस टक्के शेतमाल शेजारील राज्यांमधून येतो असते . मात्र संपामुळे राज्यातून आवक पूर्णपणे थांबली आहे. बाजार समितीत कांद्याचा एकही ट्रक आलेला नाही. नवी मुंबई एपीएमसीमध्ये आज फक्त 140 गाड्यांची आवक झाली आहे. दररोज ही आवक सुमारे 500 गाड्यांची असते. तर शेजारील गुजरात, कर्नाटकचा सीमाभाग, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधून सुमारे साडेतीनशे ट्रक भाजीपाला आणि फळांची आवक  झाली आहे.  आवक घटल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्यांच्या दरात दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातील दरांची वाढ सुमारे पंचवीस टक्क्यांवर पोहोचली.  भाजीपाल्याची आवक घटल्याने याचा परिणाम ग्राहकांना उद्या जाणवणार आहे.

COMMENTS