मुंबईत बुलेट ट्रेनची एकही विट रचू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही विट रचू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

मुंबई – काल एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वेवर आणि केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. आधी मुंबईतल्या सोईसुविधांकडे लक्ष द्या मग बुलेट ट्रेनच्या बाता मारा असंही राज म्हणाले. येत्या 5 ऑक्टोबरला चर्चगेट स्टेशनवर मोठा मोर्चा काढणार आहोत, त्यात मुंबईकरांनी सहभागी व्हावे अशी विनंतीही राज ठाकरे यांनी केली आहे. या मोर्चातून रेल्वेला आणि केंद्र सरकारला जाब विचारु असंही राज म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही राज यांनी जोरदार टीका केली आहे. एवढा खोटा बोलणारा पंतप्रधान आपण पाहिला नाही या शब्दात त्यांनी पंतंप्रधानांवर हल्लोबोल केला. काँग्रेस जाऊन भाजप आलं, नोटेचा रंग बदलण्याशिवाय काय फरक पडला असा सवालही राज यांनी केला आहे.

COMMENTS