मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

औरंगाबाद – कर्जमाफीच्या मुद्यावरुन चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना तातडीची 10 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र 1 महिना उलटून गेला तरी त्याची अंमलबजावणी केली नाही. ही एक प्रकारे फसवणूकच आहे. त्याविरोधात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पैठणमधील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पैठण तालुक्यातील वाहेगावचे शेतकरी संतोष सोनवणे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

COMMENTS