सुनील तटकरेंच्या पुस्तक प्रकाशनाला मुख्यमंत्र्यांनी फिरवली पाठ !

सुनील तटकरेंच्या पुस्तक प्रकाशनाला मुख्यमंत्र्यांनी फिरवली पाठ !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलेच नाहीत.  सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीला आज 30 वर्षे पूर्ण झाली. या निर्मित्याने आज मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मात्र सिंचन घोटाळ्यांवरुन राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासोबत मंचावर बसण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव करणार असतील, तर सिंचन घोटाळ्याची चौकशी कशी होणार?’ असा सवाल ही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होता.  या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का? अशी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे.

दरम्यान, हा कार्यक्रम सुरु होण्याआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रविंद्र नाट्य मंदिराबाहेर निदर्शनं केली आणि कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा आग्रह केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारत ताब्यात घेतले.

COMMENTS