मोदींच्या कार्यकाळात जातीय हिंसाचारामध्ये 41 टक्क्यांनी वाढ, संसदेत गृहराज्यमंत्र्यांची कबुली

मोदींच्या कार्यकाळात जातीय हिंसाचारामध्ये 41 टक्क्यांनी वाढ, संसदेत गृहराज्यमंत्र्यांची कबुली

मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये तब्बल 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी माहिती गृहराज्यमंत्र्यांनी संसदेत दिली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये सांप्रदायिक आणि जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज संसदेत सादर केली.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा (एनसीआरबी) अहवाल सादर करत अहिर यांनी हिंसाचाराच्या वाढत्या आकडेवारीची माहिती दिली. यात ‘2014 मध्ये धर्म, जात आणि जन्मस्थान यावरुन हिंसाचाराच्या 336 घटना घटना घडल्या होत्या. 2016 या वर्षात ही संख्या वाढून थेट 475 वर जाऊन पोहोचली,’ अशी माहिती गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली.

 

गोरक्षकांच्या हिंसेवरील प्रश्नाला उत्तर देताना अहिर यांनी ही आकडेवारी सादर केली. मात्र आपल्याकडे गोरक्षकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराबद्दल कोणतीही आकडेवारी नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘राज्यांचा विचार करता जातीय, सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये 49 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 2014 मध्ये राज्यांमध्ये अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या 318 घटना घडल्या होत्या. 2016 मध्ये हा आकडा वाढून 474 वर गेला. मात्र केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. असे अहिर यांनी संसदेला सांगितले.

COMMENTS