“मोदी संघाशी चर्चा करून देश चालवतात”

“मोदी संघाशी चर्चा करून देश चालवतात”

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. लोकसभेत नाही तर आरएसएस सोबत चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश चालवतात. तसेच मोदी हे केवळ आपल्या ‘मन की बात’ला देशावर थोपवू पाहत आहेत. पण देशाच्या जनतेचा आवाज ते ऐकून घेत नाहीत. अशा सामान्य लोकांचाही आवाज ऐकला जावा, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.

असंघटीत क्षेत्रातील लोकांचा आवाज देशासमोर आणण्यासाठी काँग्रेस एका नवीन संघटनेवर काम करत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ते एक प्रोफेशनल काँग्रेस बनवण्याची तयारी करत आहेत. ज्याद्वारे असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा आवाज राजकारण्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील. या प्रोफेशनल काँग्रेसची धुरा पक्षाच्या चार वरिष्‍ठ नेत्यांच्या हाती असणार आहे ज्यामध्ये शशि थरूर, मिलिंद देवडा यांचा समावेश आहे.

COMMENTS