राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निलंबित केलं तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आमचा संघर्ष सुरुच राहील – जयंत पाटील

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निलंबित केलं तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आमचा संघर्ष सुरुच राहील – जयंत पाटील

राजकारण करत सरकार हे शेतकर्यांची कर्ज माफी करत नाही, जनाची नाही तर मनाची लाज असली तर, या राज्यसरकारने शेतकर्यांची कर्ज माफी करावी. अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. 

सांगली जिल्ह्यातील हिंगनगाव येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी पाटील यांनी केली. त्यावेळी पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हिंगनगाव येथील द्राक्ष बाग़ जमीनदोस्त झालेल्या शेतकरी प्रशांत माळी यांची पाटील यांनी विचारपुस केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी घाटनान्द्रे येथे कर्जा कंटाळून आत्महत्या केलेले शेतकरी सोपान शिंदे यांच्या कुटुंबियांची जयंत पाटील यांनी भेट घेऊन, त्यांचं सांत्वन केले.

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निलंबित केल तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमचा संघर्ष सुरुच राहील, सरकारने तातडीने नुकसान ग्रस्त शेतकार्याना मदत करावी, या बाबत आम्ही विधानसभेत मागणी करतोय. अस ही जयंत पाटील म्हणाले.

COMMENTS