विरोधकांमधील मतभेद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार !

विरोधकांमधील मतभेद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार !

राज्य विधिमंडळात नेत्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.  यामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी की राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पैकी कोणाचा ठराव आधी घ्यावा यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद सुरू आहे. त्याचे परिवसन अधिवेशनाच्या आधीच विरोधक दुभंगण्यात झाले आहे. आता यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. या वादातून सर्वांशी चर्चा करुन सामंजस्याने तोडगा काढू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या वादातून तोडगा काढण्यासाठी आता एक समिती बनवण्यात येणार असल्याचं समजतंय. यामध्ये विधीमंडळातील सर्व पक्षांचे गटनेते, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांची ही समिती असेल असंही समतंय. ही समिती चर्चा करुन आधी कोणाचा ठराव करायचा हे निश्चित करेल.

COMMENTS